महाराष्ट्र राजकीय

*अखेर शेतक-यांचे विठ्ठल, भक्ताला निवांत भेटले*

*शेतक-यांचे विठ्ठल भक्ताला निवांत भेटले*

जवळा ते बारामती 600 किमी. प्रवास करणारे शेतकरी संजय खंदार यांना भेटले.

मुंबईला खदारांना आणण्यापेक्षा मीच पुण्याला येतो असे साहेब मा.राजेंद्रदादा पवार यांना बोलले होते.

पुणे येथे तब्बल दीड तास मंगळवार दिनांक 15 डिसेंबरला पवार साहेब संजय खंदार यांना भेटले. आस्थेने विचारपूस केली. गावा विषयी, जिल्ह्याविषयी, पीक पाण्याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. बोण्डअळीने झालेले विदर्भाचे नुकसान संजय भाऊंनी साहेबांना सांगितले.

पवार साहेबानी यवतमाळ जिल्ह्यातील व विदर्भातील अनेक जुन्या आठवणी देखील निवांत पणे यावेळी सांगितल्या.

शेतकरी पदयात्रा दिंडीच्या आठवणी काढल्या.

संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांच्या भेटीच्या गोष्टी सांगितल्या.

संजुभाऊला सोबत घेऊन जेवण देखील केले.

यावेळी मा. प्रविणदादा गायकवाड, अमोलजी काटे* सोबत होते.

जवळा गावाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर संजयभाऊ खंदार यांच्या या ऐतिहासिक पदयात्रेने आले याचा अभिमान वाटतो.

जवळा नगरीत बुधवार दिनांक 16 डिसेंबरला येत आहेत.

त्यांच्या जिद्दीस

त्यांच् धाडस वाखण्या सारखे आहे

त्यांच्या सफल पदयात्रेचे जवळा वासीयांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

व आगमना निमित्त

जवळा ग्रामपंचायत मध्ये सत्काराने झालेली प्रवासाची सुरुवात काटेवाडी ग्रामपंचायत मध्ये महासत्काराने सांगता करून गेली.

(काटेवाडीच्या सरपंच पदापासून आदरणीय पवार साहेबांची कारकीर्द सुरू झाली होती हे विशेष.)

Copyright ©