यवतमाळ शैक्षणिक

लिंगायत समाज ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

लिंगायत समाज ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

(वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठान चा उपक्रम)

वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ,आणि वसुधा प्रतिष्ठान,यवतमाळ यांचे वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच गुणगौरव सोहळा बसवेश्वर भवन येथे संपन्न झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्या बद्दल कृतज्ञतेची भावना जोपासत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरिता वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ व वसुधा प्रतिष्ठान यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक व इयत्ता दहावी व बारावी त्यासोबतच उच्च शिक्षण प्राप्त करून ध्येयापर्यंत मजल गाठणारी विद्यार्थी त्या सोबतच विशेष नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी यांचा गुणगौरव शाल श्रीफळ,आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक श्री.जयंतकुमार शेटे हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणुन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यवतमाळ्च्या अस्मिता अरूण बाजारे, आकाशे लिंगायत समाजाचे गाढेअभ्यासक डॉ.अशोक मेनकुदळे,वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर उमरे ,वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर,लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्षा , रश्मी अंदुरकर ,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रसंगी अस्मिता बाजारे ह्यांनी आपले विचार मांडले. जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही संघर्षा मधूनच जीवन घडविल्या जाऊ शकते,मुलांनी मोबाईलच्या जगातुन बाहेर यावे आणि आपल्या धेर्याचा वेध घ्यावा असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले, तसेच जीवनात खरे यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त भावना याची जाणीव असणे हे फार महत्त्वाचे आहे,

विद्यार्थ्यांनी काळासोबत आपली पाऊले उचलली पाहिजे. काळासोबत नवीन गोष्टी स्विकारल्या पाहिजे. तेव्हाच जीवनात यश मीळु शकतं. ज्यांना यश मिळालं त्यांच अभिनंदन.

तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचं जीवन कुटुंब आणि समाजासाठी दिलं त्यांना माझा प्रणाम. आपल्या अनुभवाचा फायदा त्यांनी आता समाजाला करून द्यावा आणि सफल जीवनाची अनुभूती घ्यावी, असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतकुमार शेटे यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमा मध्ये राजेंद्र मेनकुदळे ह्यांनी शिष्यवृत्ती करिता पन्नास हजार रूपये मंडळाला दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले, तसेच गरजु विद्यार्थांनी शिष्यवृत्ती करिता संपर्क करावा असे सांगण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव निलेश शेटे यांनी केले तसेच लिंगायत वधू वर परिचय मेळाव्याच्या वेबसाईट बद्दल त्यांनी माहिती दिली व येत्या नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आंतरराज्यीय लिंगायत समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याची तारीख लवकरच जाहिर होईल असे म्हणाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली कोचे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन गजानन हातगावकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयेश हातगांवकर,गिरीष गाढवे, निलेश शेटे,गजानन हातगावकर, नागेश कुल्ली, विनोद नारिंगे,बाळासाहेब दिवे,सुरेश शेटे, जयंत डोंगरे, रमेश केळकर,भुषण तंबाखे, विनोद देशमुख, राजु कुर्हेकार,मंगेश शेटे,सुधाकर केळकर,अभय देमापुरे, संजय तोरकडी,निर्मल ठोंबरे, प्रशांत शेटे,अशोक जिवरकर,

सौ कल्पना देशमुख,सौ.पद्मश्री हातगांवकर, सौ उज्वला नारिंगे, सौ.उषा कोचे,सौ.सिमा केळकर, सौ.तेजश्री मानेकर, सौ.स्वाती हातगांवकर,रेणुका कुल्ली,आदींनी परिश्रम घेतले

Copyright ©