जोडमोहा येथे मयत चक्क न्यावी लागते पुरामधून
आमदाराचे हवेत गेले आश्वासन
निस्क्रीय जोडमोहा ग्रापंचायत चां भोंगळ कारभार
जोडामोहा येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार असून आजही स्मशान भूमी मध्ये जाण्यास रस्ता नाही, पुल नसल्याने गावात झालेली मयत चक्क पुरातून न्यावी लागते, ग्रामपंचायत ला वेळी वेळी पुलाची मागणी केली,परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने आमदार,यांना या बाबतची वेथा मांडली ,त्यांनी आश्वासन दिले की पुलाचे तातडीने काम करून देऊ मात्र अजूनही पुल तर झालाच नाही ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत च आहे नदीला पुर आला की मयत घरी ठेऊन पूर ओसरण्या ची वाट बघावी लागते आणि कंबर भर पुरांमधून मयत न्यावी लागते हि दैनीय अवस्था जोडमोहा वाशियांची झाली आहे,भविष्यात अनुचित घटना ही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे.
Add Comment