आर्णी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदना द्वारे मागणी!
हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणावी, तसेच अयोध्यानगरी मद्य- मास मुक्त करा !
आर्णी – भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या, तसेच केंद्र शासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल सर्टिफिकेट व्यवस्था भारतात राबवली जात आहे. या बेकायदेशीर हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेश सरकारने बंदी आणली आहे. त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच येत्या 22 जानेवारी 2024 अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी संपूर्णपणे मद्य मासमुक्त करावी अशा या मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आर्णी येथील उपविभागीय अधिकारी श्री. गोपाळ देशपांडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
पूर्वी हलाल व्यवस्था केवळ मांसाहारी पदार्थ पुरती आणि मुसलमान देशात निर्यातीपूर्ती मर्यादित होती, मात्र धर्मनिरपेक्ष भारतात सध्या काही खाजगी कट्टरतावादी इस्लामी संस्थांकडून धान्य, फळे, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल, डेटिंग साईट आदी. सर्वच क्षेत्रे हलाल सर्टिफाइड करून हिंदू व्यापाऱ्यांचे शोषण केले जात आहे. भारत शासनाच्या अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)या अधिकृत संस्थेकडून प्रमाणपत्र घेतलेले असतानाही व्यापाऱ्यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी 47 हजार रुपये शुल्क भरून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. तसेच नूतनीकरणासाठी दरवर्षी 20 हजार पाचशे रुपये द्यावे लागत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पैसा आपल्या देशात बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या 700 आतंकवाद्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी वापरला जात आहे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. तसेच केवळ 15 टक्के लोकांसाठी, 85 टक्के लोकांवर हलाल उत्पादने लागणे हा धार्मिक अन्याय आहे.
येत्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची होत आहे, त्यामुळे देशभरातून कोट्यावधी हिंदू व्हावी हे भगवान श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी अयोध्येला पोहोचणार आहे. मंदिरे ही हिंदू धर्माची आधारशिला आहेत या मंदिराचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक हिंदू हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे हरिद्वार आणि ऋषिकेश येथेही मद्य-मास यावर शंभर टक्के बंदी आहे. याच धरतीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मास मुक्त करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत.
यावेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. राजेशजी माहेश्वरी, बजरंग दलाचे श्री. सुनिल सूर्यवंशी, अक्षय माहूरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री. अशोक मुनगिनवार, विवेक पांडे आदी. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment