यवतमाळ सामाजिक

विद्युत कंपनी ची मनमानी,शेतकऱ्यांच्या जिवारी येत आहे

विद्युत कंपनी ची मनमानी,शेतकऱ्यांच्या जिवारी येत आहे

विद्युत कंपनी ची मनमानी कारभाराने शेतकऱ्यांच्या जिवारी येत आहे.लोडशेडींग तर सुरू आहे त्यात हि आता चक्क विद्युत पुरवठा बंद करणे सुरू केल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे पावसाची गरज असताना पाऊस नाही,विहिरीचे पाणी द्यावे तर लाईन नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकास जगवावे तर कसे , सुरुवातीला पावसाने कहर केला यात अनेकांचे पिके खराब झाली तर काहींचे वाहून गेली, काहींचे पिके उभी आहे तेही पाण्या अभावी वाळत आहे आणि विद्युत कंपनी वीज देत नाही तर शेतकऱ्यांनी करावं तर असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तरि लोकप्रतिनिधींना जाग येईल का ? असा सवाल शेतकऱ्यानं कडून करण्यात येत आहे.

Copyright ©