Breaking News महाराष्ट्र

25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने राज्यात हृदय हेलावणारी घटना

वर्धा देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने राज्यात हृदय हेलावणारी घटना

नागपूर ते पुणे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सला समृध्दी महामार्गावर भीषण अपघात

वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवाशांचा अपघातामध्ये समावेश होऊन मृत्यू

इंजिनिअरची ची नोकरी जॉईन करन्या पूर्वीच काळाचा घाला

नागपूर ते पुणे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सला समृद्धी .महामार्गावर भीषण अपघात झाला. ही ट्रॅव्हल्स नागपूर येथून ५ वाजता च्या दरम्यान निघाली होती. त्यात २७ प्रवाशी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे .टायर फुटून ट्रॅव्हल्स डिव्हायडरवर धडकली. एसी बस असल्याने लवकर या बस नी पेट घेतल्याचे सांगण्यात आले.यात वर्धा जिल्हातील १४ प्रवाशी असल्याचे माहिती मिळताच अल्लीपूर येथील एक प्रवाशी होती कुमारी संजीवनी शंकरराव गोठे वय २२ वर्ष ही अल्लीपूर येथून पुण्याला जॉब साठी जात असताना तिचा अपघाता मध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

संजीवनी गोठे ही इंजिनिअरची जॉब लागल्यामुळे पुण्याला जात होती मात्र पुण्याला जाण्या अगोदरच तिच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे .

त्यामुळे अल्लीपुरात शोकांतीका मावळली आहे .

संजीवनीची मोठी बहीण आहे ही पुण्यात जॉब करीत आहे तिचे वडील भारतीय जीवन विमा चे एजंट आहे व सोबत शेती करतात .तीची आई घरकाम करते अचानक झालेल्या दुर्दैवी अपघात मध्ये मृत्यू झाल्याने गावात शोकांतीका मावळली आहे यात इतर प्रवाशांचा शोध घेणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे

Copyright ©