यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या आंध्रातील पक्षाला महारास्ट्राचा पुळका कसा ?

महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या आंध्रातील पक्षाला महारास्ट्राचा पुळका कसा ?

राज्यात आता नवीन पक्ष सर्वसामाण्याना फसवण्यासाठी सवंगडी जमविण्यास लागला आहे अनेक मोरक्या ना पकडून त्यांना गाडी,खर्चा करीता पैसा, व साहित्य देऊन जनतेला उल्लू कसे बनवता येईल याचा कान मंत्र देऊन भोळ्या भाबड्या जनतेला नको ते आमिष देऊन मत मागण्याचा प्रकार सुरू आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांचा खरा पुळका आहे तर अगोदर त्यांना मदत करा,शेती करण्यास सक्षम करा,त्यांचा शेत माल जागेवरून खरेदी करा,शेत मजुरांना चांगले काम,त्याचे चांगले दाम द्या मगच जनते समोर मताची झोळी पसरवा.जेथे तुम्ही झोळी पासरवताहेत तेथे तुमचं काय अस्तित्व,काय काम केले,अगोदर तुमचे काम दाखवा नंतर झोळी फैलवा महाराष्ट्रात कोणाचे भले केले त्याची पावती द्या मगच बोला,पैशाने चार लोकं विकत घेऊ शकता मतदार नाही ,मतदार हा सुज्ञ आहे,आमिषाला बळी पडत नाही आज पर्यंत अनेक झन आले,अनेक वचने दिली,आणि सत्ते साठी सर्व विकली असे राज्य कर्ते आम्हाला नको आहे हवे आहे ते समाज सुधारक समाज विघातक नको,जनता आता लबाडाच्या आवतनाला जात नाही,त्यांना हवे निष्ठा व काम,आज पर्यंत अनेकजण आले स्वार्थ साधून गेले,सर्वसामान्यांचा कैवारी कुणी नाही,आज पाया पडतात,उद्या निवडून आले की पाहायला तयार नाही काम कुठून करणार,यांचे दीड दमडी चे पिये हि आपल्याला दोन गोष्टी सुणावून देतात तुम्हाला निवडून देणे हीच आमची चुकी का असा सवाल स्व: बरोबरच करीत परत यावे लागते असे नेते आम्हाला नको .

Copyright ©