देवळी प्रतिनिधी:सागर झोरे
रत्नापूर ग्रा.प.परिसरात वृक्ष लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा
घर तिथे झाड लावा सरपंच सुधीर बोबडे
रत्नापूर ग्रामपंचायत च्या आवारामध्ये सरपंच सुधीर बोबडे यांच्या हस्ते वृक्ष लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.सध्या आधुनिक युगामध्ये मानवाच्या सुख सुविधा करिता मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे.त्यामुळे निसर्गाचे समतोल बिघडत आहे आणि प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे यांनी ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लावून उपस्थित गावकऱ्यांना घर तेथे झाड लावण्याचे आवाहन केले आहे.जर वृक्षांची संख्या वाढत राहिली तर त्याने पर्यावरणाचे समतोल राखता येईल व प्रदूषणात आढा बसेल त्यामुळे घर तिथे झाड लावणे आजची गरज आहे असे सरपंच सुधीर बोबडे या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपसरपंच सौरभ कडू,देविदास वाघ, विद्या ठाकरे,सुनिता सडमाके,सुनील खडसे,रमेशराव कडू,तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
Add Comment