महाराष्ट्र सामाजिक

अजनावती शिवारातील शेतकऱ्यांचा एक महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

अजनावती शिवारातील शेतकऱ्यांचा एक महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित

ओलीत पिकाचे नुकसान,विद्युत तारे जमिनीला लोमकाळत शेत वाईला अडचण

विधुत महावितरणचे याकडे होत आहेत हेतू परस्पर दुर्लक्ष

 

दिघी टाकळी खोडे या भागातील अजनावती शिवारातील एक महिन्यापासून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे शेतातील ओलीत पिकाचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने देवळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात तसेच अधिकाऱ्यांना निवेदन प्रत्यक्षात भेटून दिले व होत असलेल्या नुकसानाची माहिती पण दिली परंतु एक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही.जनावरांच्या चाराची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये कडाळू ची लागवड केलेली आहे या एक महिन्यापासून कडाळूला पाणी देण्यात न आल्यामुळे कडाळू संपूर्ण पने सुकलेला झाल्याचे दिसत आहे.शेतकऱ्याचे चाराचे नुकसान झाले.अजनावती शिवारामध्ये विद्युत वितरण कंपनीची डीपी आहे या डीपीवरून परिसरातील २० ते २२ शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो वादळामुळे विजेचे खांब वाकले व तारे लोमकाळले असल्याने दुरुस्तीचे काम करणे गरजेचे असताना काम करण्याकरिता अधिकारी वर्ग मजूर नसल्याचे सांगतात तारे लोमकाळले असल्याने शेतकऱ्यांना जाणे येणे व शेतवाही करण्याची अडचण झालेली आहे या विद्युत तारे व डीपी ची कामे त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी शेतकरी वसंतराव गाठे यांच्या नेतृत्वात अजनावती शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Copyright ©