यवतमाळ –
खामगांवचे प्रखर हिंदुत्ववादी हिंदू महासभेचे जेष्ठ नेते स्वर्गीय विर सावरकरांचे विचार स्पष्टपणे मांडणारे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार लक्ष्मणलालजी खत्री हे ७५ वे वर्ष पुर्ण करुन अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त मोहन मार्केट जुनी मोहन टॉकीज खामगांव येथे दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे, दंडेस्वामीजी महाराज, खामगांवचे परमपुज्य श्री केशव आश्रम, अर्बन बँक खामगांवचे संचालक, मनोहरराव कुळकर्णी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तेव्हा यवतमाळकरांनी व खामगांव वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रामदादा मोहिते, किशोर रुपारेल, चंद्रशेखर शेवलकर, चंद्रशेखर पुरोहित, मनिष खेतान आदिंनी केले आहे.
Add Comment