बळीराम पाटील महाविद्यालयात रासेयो च्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न
बळीराम पाटील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित क्लिन इंडिया अंतर्गत महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान दि.१९ आक्टोबर२०२२ रोजी राबविण्यात आले. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पहिल्या सत्रात सकाळी ठीक दहा वाजता महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनेचे महीला कार्यक्रमाधिकारी प्रा सुलोचना यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर हे लाभले
स्वच्छ अभियानाच्या दूसर्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालया अंतर्गत व महाविद्यालयाचा परिसरातील जवळपास १० किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर प्लास्टिक कचरा मुक्त करुन स्वच्छ करण्यात आला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रसेयो स्वयंसेवक सेविका यांनी प्रयत्न केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने झाली.
Add Comment