Breaking News यवतमाळ

शेतकऱ्याने रक्ताची बनवली शाही,त्यानेच लिहिले मुख्यमंत्री यांना पत्र

शेतकऱ्याने रक्ताच्या बनवली शाही,त्यानेच लिहिले मुख्यमंत्री यांना पत्र

देशाचा पोशिंदा रक्ताचे पाणी करून देशाला जागविण्याचा आतोनात प्रयत्न करतो तो आहे म्हणून जग आहे,हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात मात्र तोच पोशिंदा मरणयातना भोगत आहे आणि सरकार ला या कडे लक्ष देण्यास वेळच नसल्याने अखेर आपल्या रक्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यास पत्र लिहिले
शासनाने दोन वेळा कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न आल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने चक्क आपल्या रक्तानेच मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले पत्र लिहिताना रक्त गोठत असल्याची दहाहक्कता नमूद करत शासनाला केलेले अर्ज कुणाचेही मन हेलावणारे आहे कर्ज माफी मधून वंचित शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न यवतमाळ तालुक्यातील बेलोरा ( रुई ) येथील शेतकऱ्यांनी केला सुरेश बोंबलगे अशी या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनी आपल्या शरीरातील रक्ताच्या रक्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे सातत्याने वाढणारा कर्जाचा डोंगर सतत येत असलेले आसमानी संकट आणि पारंपारिक पिकाची अल्प हमीभाव यामुळे शेतकरी पूर्ण संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे तत्कालीन सरकारने 2017 मध्ये कर्जमाफी केली बहुतांशी शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली मात्र शेकडो शेतकरी आजही वंचित राहिल्याने बोंबलगे यांनी स्पष्ट केले तसेच 2019 मध्ये देण्यात आलेली कर्जमाफी तत्पूर्वी वंचित राहिलेल्या शेतकरी पात्र ठरला आहे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने देण्यात आलेल्या कर्जमाफी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे त्या दोन्ही महापुरुषांचे स्मरण करून उचित न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आज रक्ताने पत्र लिहिले उद्या मुख्यमंत्र्याच्या दालनात प्राण त्याग करू असा इशारा या वेळी देण्यात आला.

Copyright ©