यवतमाळ सामाजिक

मासाळा (आकोली)येथील चार शाळकरी मुले बेपत्ता

आकोली सचिन चावरे

मासाळा (आकोली)येथील चार शाळकरी मुले बेपत्ता

रात्री उशिरा सेलू पोलिसात अपहरनाचा गुन्हा दाखल
डी वाय एस पी गोकुळसिंग पाटील घटनास्थळी

जिल्ह्यात तसेच तालुक्यात सर्वत्र ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याच्या बातम्याचा प्रसार होत असताना काल अचानक मसाळा येतील चार मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली.
मसाळा येथील पप्पू मनोज देवडे वय 14 वर्ष संदीप राजदीप भूरानी वय 13 वर्ष राजेंद्र राजेश ये दानी वय 12वर्षे तसेच राज राजेश येदानी वय 11वर्ष असे चारही मुले दुपारी दोन वाजताच्या सुमारास बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली दरम्यान स्थानिकाच्या मदतीने मुलांच्या आई-वडिलांनी परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला मात्र मुले मिळाले नाही व रात्री उशिरा सेलू पोलिसात अपहरनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीवरून 363 कलमानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान रात्री डीवायएसपी गोकुळसिंग पाटील यांच्यासह सेलू पोलीस तसेच पी. आय. गायकवाड सह फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, डॉग स्क्वाड ,क्यू आर टी पथक, एलसीबी पथक सह दंगल नियंत्रण पथक का सह सर्व पथके घटनेच्या ठिकाणी तैनात करण्यात आली दरम्यान परिसरातील रिधोरा डॅम, मदन उन्नई धरण, ढगा भुवन ते जंगल परिसरात तसेच बांगडापूर पर्यंत पोलिसांकडून शोध घेण्यात आला मात्र अद्याप शोध लागलेला नसुन पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

Copyright ©