तहसील कार्यालयातील मनमानी कारभारामुळे पालक व विद्यार्थी त्रस्त
यवतमाळ तहसील कार्यालयातील मनमानी कारभारा मुळे पालक व विद्यार्थी त्रस्त झाले आहे कोणतेच प्रमाणपत्र वेळेवर देत नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे नायब तहसीलदार यांना विचारणा केली असता सरोवर डावून असल्याचे कारण समोर लाऊन वेळ काढू पणा करत आहे आणि उद्धट पणे बाहेर जाऊन बोर्ड पहा असा सल्ला देतात उत्पंनाचे प्रमाण पत्र हे कमीत कमी ४८ तासात देणे बंधन कारक असतानाही अनेक चकरा मारूनही तहसील कार्यालया मधून परत जावे लागते, सहा दिवस होऊनही केवळ उत्पन्न प्रमाण पत्र देण्यात येत नाही या कार्यालयात एकही कर्मच्यारि योग्य उत्तर देत नाही सेतू मध्ये गेले की ते म्हणातात की तहसील मधूनच यायचे आहे थंब लावल्याने प्रमाण पत्र राहिल्याचे सांगाण्यात येते नायब तहसीलदार म्हणतात एकच काम नाही ,तर सर्वसामान्यांनी काय करावं असा प्रश्न निर्माण झाला आहे शासन एकी कडे शिक्षण देण्यास नको त्या योजना राबावताहेत मात्र अधिकारी त्या कुचकामी ठरवत आहे या कडे जिल्हा अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली याची वरिष्ठांनी दखल घेऊन चालु असलेल्या मनमानी कारभाराला लगाम लाऊन विद्यार्थ्याना व पालकांना सोयीचे होईल ,तहसील कार्यालयात अर्जन्विस यांचा बाजार लागला असून सर्व सामान्यांच्या लूट सुरू आहे कुणाला माहिती नसल्याने चक्क येथील बाजार मांडून बसलेले एक अर्ज लिहिण्यास 30 ते 40 रुपये घेण्यात येते त्या अर्जाची कार्यालयात किंमत शून्य राहते सेतू मध्येच अर्ज दिल्या जातो तरी पालकाची विद्यार्थ्याची दिशा भुल करून पैसे लाटण्याचा प्रकार तहसील कार्यालयात खुले आम सुरू आहे याची तहसीलदार दखल घेणार का ? असा सवाल करण्यात येत आहे.
Add Comment