यवतमाळ सामाजिक

वादळी वाऱ्यानि हिवरी सर्कल मध्ये लाखो रुपयांचे नुकसान नुकसाभरपाई देण्याची मागणी

वादळी वाऱ्यानि हिवरी सर्कल मध्ये लाखो रुपयांचे नुकसान
नुकसाभरपाई देण्याची मागणी

परिसरातील चक्रीवादळाने हाहाकार उडवला अनेकांची घरावरील टिन पत्रे उडून गेली अनेक झाडे उन्मळून पडली घरातील धान्य निकामी झाले,अनेक झन टीन पत्रे शोधत असल्याचे दिसुन आले प्रथमच अशा प्रकारचे वादळ आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पीक निकामी झाले यात काहीचा भाजी पाला,कांदा,आंबे, टरबूज अशा प्रकारचे पीक निकामी झाले तर प्रथमच सकाळ पासूनच विद्युत पुरवठा बंद होता त्यात वादळी पाऊस हि आला त्या मुळे रात्र सर्वाँना जागुनच काढावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अशा निसर्ग कोपात, हिवरी, भांब, बेचाखेड, वाटखेड, बेलोरा ग्रामीण जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना या कडे प्रशासन लक्ष देऊन, मंगरूळ इत्यादि गावात नुकसान झाल्याने नुकसान ग्रस्तांना तातडीने सानुग्रह निधी देण्यात यावा अशी मागणी जणते कडून करण्यात येत आहे

Copyright ©