यवतमाळ सामाजिक

बळीराम पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी 

किनवट प्रतिनिधी

बळीराम पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 
बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ०१ आक्टोबर २०२१ रोजी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी दोन्ही महापुरुषांच्या चरित्रावर प्रकाश टाकला.महात्मा गांधी यांनी सत्य ,अहिंसा व न्याय या तत्वामुळे देशाला स्वातंत्र्य मिळतेच या विचारावर ठाम होते. देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आहे. याची प्रचिती संबंध देशाला आली आहे. कोविड- १९ च्या काळात आली . शहराकडील लोंढा हा खेड्याकडे तीव्र गतीने येऊ लागला आहे. लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु नंतर देशाची संपूर्ण जबाबदारी यांच्या वर पडली.भारत-चीन, भारत-पाकिस्तान च्या युध्द मय परिस्थितीत देशाची सक्षम धुरा सांभाळली आहे.ज्यांनी “जय जवान-जय किसान” व हिंदी-चीनी भाई-भाई नारा त्यांनी उदघोषला आहे. व संबंध जीवन भर देशाचे जवान व शेतकरी यांच्यासाठी जीवन खर्ची केले.
प्रसंगी सर्वप्रथम उपप्राचार्य डॉ जी.एस.वानखेडे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन नकरण्यात आले.उपस्थित पर्यवेक्षक प्रा .अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार डॉ.आनंद भालेराव प्रा.राजकुमार नेमानीवार, डॉ कार्यक्रमाधिकारी कनिष्ट विभाग प्रा. पुरुषोत्तम येरडलावार महिला कार्यक्रमाधिकारी ,प्रा सुलोचना जाधव, डाँ लता पेंडलवाड , प्रा.एम.एस.राठोड,प्रा ज्ञानेश्वर चाटे ,प्रा योगेश सोमवंशी, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

Copyright ©