यवतमाळ सामाजिक

यवतमाळ ते सावर रस्त्याने प्रवाश्यांना करावे लागते जीव मुठीत घेऊन प्रवास

———————————————-
यवतमाळ- सावर वरून येणारा मुख्य रस्ता शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने कित्येक वर्षांपासून निस्कामित झाला आहे. या रस्त्याने प्रवास करणे मोठ्या जिकरीचे झाले असून जीव मुठीत घेवून प्रवास करावे लागत आहे.
सावर मार्गे यवतमाळ ला येण्यासाठी हा मुख्य रस्ता असताना सुध्दा आणि या रस्त्याची दुर्दशा या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना माहीत असताना सुध्दा ते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने वाहन चालविणे तर सोडा साधे पायदळ सुध्दा चालणे अवघड झाले आहे. एखादे वेळेस रुग्णांना आणताना तारेवरची कसरत करून मार्गक्रमण करावे लागते. या भागातील लोक प्रतिनिधी निवडणूक आली की आश्वासनाचे भडिमार करतात मात्र एकदाचे निवडून आले की त्यांचे आश्वासन हवेत विरून जातात. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाष्याचे खूप हाल होत आहे. या रस्त्याने नेहमी प्रवास करणाऱ्या अनेकांना हाडाचे विकार निर्माण झाल्याचे चित्र ऐकण्यात आहे. प्रसूती चे रुग्ण या रस्त्याने न्यायचे झाल्यास सर्व देवी देवतांना आठवण करावी लागते. अश्या या गंभीर समस्ये कडे संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून हा रस्ता दुरुस्त करावा आणि या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशास या संकटातून सुटका द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Copyright ©