विदर्भ सामाजिक

प्रहारच्या इशाऱ्याने गटविकास अधिकाऱ्यानी अपंग बांधवाच्या समस्यांचे केले निराकरण

 

अंबड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग बांधवांचे 5% राखीव सहायता निधी पडून आहे. जिल्हा परिषद कार्यालय जालना व पंचायत समिती कार्यालय अंबड या दोन्ही कार्यालयास वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित अधिकार्यांनी अपंग बांधवांच्या हितासाठी कोणतेही निर्णय अाज पर्यंत घेतले नव्हते. सध्या कोरोणा च्या काळात अपंग बांधव फार अडचणीत सापडलेले आहेत, अंबड तालुक्यातील अपंग बांधवांच्या या महत्त्वाच्या मुद्दयांवर अधिकारी दुर्लक्ष करत होते.

दिव्यांग बांधवांच्या अशा विविध समस्या ची दखल घेऊन,
प्रहार जिल्हाध्यक्ष मा. विदूर लाघडे, व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.विठ्ठल चव्हाण यांच्या सुचनेवरून प्रहार युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळवणे यांनी गटविकास अधिकारी साहेबांची भेट घेऊन निवेदन दिले होते की, अंबड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयास एक पत्र काढून दिव्यांग बांधवांचा ५% राखीव निधी तात्काळ वाटप करण्यात यावे अन्याय प्रहार च्या वतीने अंबड पंचायत समिती कार्यालयात साप छोडो आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. दि. 23/जून/2021 बुधवार रोजी सुरेश खरात तालुकाध्यक्ष (प्रहार अपंग संघटना अंबड), संदीप धुळे (प्रहार जिल्हा सचिव जालना), जुबेर पटेल (प्रहार प्रसिद्धी प्रमुख जालना),
अशोक जमधडे(संपर्क प्रमुख अपंग संघटना अंबड), आकाश थेटे (प्रहार युवा तालुकाध्यक्ष अंबड), राधेश्याम काळवणे, अविनाश पांजगे आदींच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयास निवेदन दिले होते.

पंचायत समिती कार्यालयात साप छोडो आंदोलनाचा इशारा देताच गटविकास अधिकारी साहेबांची दि. 24/जून/2021 गुरूवार रोजी एका पत्राद्वारे अंबड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयास सुचना दिल्या आहे कि, ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5% निधी शासन निर्णयाप्रमाणे खर्च करण्यात येऊन त्या बाबतचा अहवाल पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना तातडीने सुचवले आहेत, अन्यथा कडक कारवाई चे आदेश दिले आहे.

Copyright ©