ग्रामपंचायत जांब ता. जि. यवतमाळ या गावामध्ये रिलायन्स फॉउंडेशन कडून गावातील गरीब व गरजू कुटुंबाच्या सर्वे करून त्यांना राशन किट देण्यात आले,या नियोजनामुळे कीट घेण्यासाठी गर्दी झाली नाही व शासन नियमांचे पालन करत हा उपक्रम राबवण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये लॉकडाऊन आहे, या लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंब नगरिकाचे रोजगार हिरावले आहे, त्यांना मजुरी मिळणे फार अवघड झाले ,त्यांचे हातावर पोट असण्यारा कुटुंबाचे आर्थिक परिस्तिथी बिघडलेलि आहे गरीब गरजू कुटुंब आज उघड्यावर आले आहे, त्यांना आज मदतीचा हात देण्याची गरज आहे त्याची समस्या जाणून घेवुन् त्यांना रिलायन्स फॉउंडेशन कडून् राशन किट वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत चे सरपंच सोनाली टीचकुले, गावातील नागरिक पुरुशोत्तम टीचकुले, जनार्धन राठोड, वनिता चोले, रिलायन्स फॉउंडेशन सी. आर.पी. किरण येरमे राशन किट वाटप करते वेळेस उपस्थित होते. रिलायन्स फॉउंडेशन ने राबवलेल्या या उपक्रमामुळे जांब मधील नागरिकांना आधार मिळाला असून पुढील काही दिवसाची चिंता मिटली आहे.त्यासाठी गावकर्यांच्या वतीने रिलायन्स फॉउंडेशन चे खूप खूप आभार मानण्यात आले.
Add Comment