(राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन)
संपूर्ण देशामध्ये covid-19 ची परिस्थिती असताना लॉकडाऊन मुळे शाळा महाविद्यालये सर्व बंद आहे तरी ऑनलाईन शिकवणी वर्ग म्हणून सर्व शैक्षणिक सत्रांचा कार्यक्रम सुरू आहे.
तरी या लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असताना शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना फी वसुली करिता जबरदस्ती करण्यात येत आहे तरी आपणास विनंती आहे की या बिकट परिस्थितीमध्ये शासनाने मध्यस्थी करून विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालयीन ही माफ करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
अशाप्रकारे मा. तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले
निवेदन देतेवेळी अजिंक्य वैद्य अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राळेगाव तालुका, स्वप्निल कचवे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, तेजस ठाकरे, इरफान शेख, संजूभाऊ उदार, सौरभ पारिसे, शुभम मोरे व आदी उपस्थित होते.
Add Comment