यवतमाळ

दिग्रस शहरातील मुख्य मार्गावरील अरुंद रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने वाहतूक खोळंबली

 

या ठिकाणी वाहतूक खोळंबने नित्याचे झाले आहे ,प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील मुख्यमार्ग आर्णी रोड बायपास वरील वाल्मीकनगर स्थित रोडवर वाहतूक खोळंबने नित्याचे झाले आहे.या रोडवर जनावरांचा कळप आल्यावर वाहतूक खोळंबली जाते.समोरासमोर वाहने आली की वाहतूक खोळंबली जाते.अश्यातच आज सकाळी अंदाजे 9 वाजता  वाल्मिक नगर मधील रस्त्यावर एक ट्रक बंद पडल्याने आहे त्या जाग्यावरच दुरुस्ती करणे चालू असताना ट्रक च्या बाजूने महा.मं.बस जात असताना पुढून एक वाहन आल्याने बस पण जाग्यावरच थांबली बस च्या मांगे व पुढे वाहनांच्या रांगा लागत गेल्या.वाहतूक खोळंबुन मोहनाबाई शाळेच्या गेट पर्यंत वाहनांच्या रांगा लागून होत्या.तर दुसऱ्या बाजूस मोक्षधाम मधील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.स्थानिक नागरिकांनाच्या सहकार्याने तब्बल दोन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.प्रशासन या रस्त्यावरील नेहमी होत असलेल्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका देईल का असे नागरिकांतून बोलल्या जात आहे

Copyright ©