यवतमाळ सामाजिक

वंचित बहुजन आघाडी घाटंजी चा पाठींबा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा/
“शेतकरी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्या बाबत कायमस्वरूपी स्थगिती देण्यात यावी”
विदर्भातील संपूर्ण शेतकऱ्यांना माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधित सतत व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अध्यादेश काढण्यात यावा
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी विधेयक रद्द करण्यात यावे तसेच विदर्भातील संपूर्ण शेतकऱ्यांना .महाराष्ट्र शासन निर्णय क्र.सि.एल.एस.२०२०/प्र.क्र.२१९/म-३ दिनांक ०९ नोव्हेंबर २०२० या निर्णयाच्या धर्तीवर विदर्भातील संपूर्ण शेतकऱ्यांना माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधित सतत व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अध्यादेश काढण्यात यावा.सोयाबीन व कापूस व अन्य पिके यांची विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी.कापूर व सोयाबीन या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी.आणेवारी नुसार शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती व कर्जाच्या वसुलीची स्थगिती देऊन पुनर्गठन करण्यात यावे.शेतकरी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्या बाबत कायमस्वरूपी स्थगिती देण्यात यावी.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेंतर्गत सन २००९ ते २०१६ पर्यंत ची कर्जमाफी पूर्णतः निकालात काढावी .सततचा व अवकाळी पावसामुळे सोयाबीन,कापूस अन्य पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा.या विविध मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी वतीने तहसील कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे याच्या नेर्तुत्वात निदर्शने करण्यात आले.
यावेळी सदर मागण्यांचे निवेदन देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना घाटंजी नायब तहसीलदार राठोड साहेब यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले. या प्रसंगी शेतकरी नेते मोरेश्वर वातीले, यांनी यावेळी सरकारच्या धोरणावर आसुड ओढत सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या आंदोलनात युवराज आडे, सुरज टेकाम, सोपान पंधरे अशोक देवतळे,सय्यद सरफराज, महेंद्र कांबळे,अनंत सोनडवले,हरिदास खोब्रागडे,भगवान बन्सोड,हरिदास खोब्रागडे,मधुकर सातपूडके,विलास तोडसाम,रामेश्वर मडावी,प्रेमानंद उमरे,विनायक नगराळे,सचिन राठोड,दीक्षांत वासनिक,सुरज रामटेके,साहिल रामटेके, गौरव शेंडे,यशवंत भगत,रा. वि. नगराळे,नरेंद्र भगत,नंदकुमार देवतळे इत्यादी असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Copyright ©