*दिग्रस प्रतिनिधि* ,
दिग्रस ते दारव्हा या रोड हायवे ला लागूनच मांडवा गाव आहे. या गावाजवळील पुलाचा भाग हे पूर्णपणे खचला असून तो रस्ता प्रवासा करिता व गावातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. मागील काही दिवसा अगोदर या पूला बाबत गावकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर बांधकाम विभागाने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्यामुळे आता या पुलाचा भाग पूर्णपणे खचून गेला आहे. या अगोदर दिग्रस – दारव्हा रोडवरील खूप अपघात झाले आहेत. तरी पण मांडवा गावाजवळील पूलाकडे प्रशासन दुर्लक्ष करुन प्रवास्याच्या जीवाची पर्वा न करता प्रशासन सुस्त बसले आहे. या नंतर तरी आता प्रशासन ला जाग येईल का ? या एखाद्या प्रवाशाचा व गावातील लोकांचा जिव गेल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देणार का ? असा सर्वसामान्य लोकांमध्ये कूलबूल होत आहे. मांडवा गावाजवडील पुलाचा भाग खचून गेल्यामुळे आता गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या कडे प्रशासन काय कारवाई करणार या कडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Add Comment