ग्राम स्वराज्य महामंच ही सामाजिक संघटना आहे या महामंच मध्ये राष्ट्रसंत विचारधारा चे संपूर्ण मानसं कार्य करण्यासाठी तयार आहे.या वर्षा त विविध उपक्रमात सहभाग नोंदवुन लोकांना सामाजिकता जिवंत ठेवण्यासाठी गावा गावात जावुन ग्राम सभा घेनारं आहे.नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्य आणि सरपंच यांना योग्य आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी गावकरी लोकांनी ग्राम पंचायत सभागृहात पाठविले परंतु याना शासकीय नाँलेज नाही बहुसंख्य ग्राम पंचायत चा कारभार सचिव पाहतो ही बाब लोकशाही प्रक्रियेत हाणिकारक आहे.गावात योग्य ग्राम सभा होत नाही हे मोठे दुर्देैव आहे.ग्राम पंचायत मध्ये ग्राम सभा ही अतिशय महत्वाची आहे म्हणुन वार्ड निहाय ग्राम सभा घेणे हा निर्णय ग्राम सभेत सरपंच यानी घेतला पाहिजे.
१]वार्ड निहाय ग्राम सभा घेणे
२] वार्षिक अहवाल ग्राम सभेत सादर करणे
३]१०० % घरगुती कर वसूली करने आणि वरील सरकार ला दाखविने
४]रस्ते आरोग्य आणि शिक्षण या साठी Rural Master Plan तयार करणे
५]गावा गावात ग्राम स्वराज्य महामंच स्थापना करणे
असे महत्वपूर्ण विषय घेवुन आम्ही येत आहो या साठी आम्ही सरपंच आणि उपसरपंच याना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे आहे हा निर्णय ग्राम स्वराज्य महामंच यांनी घेतला आहे तरी आपण सहभागी होवुन ग्राम स्वराज्य महामंच याना सहकार्य व्हावे हीच आमची अपेक्षा
Add Comment