ढगाळ वातावरणामुळे वाढोणा बाजार तालुक्यातील हरभरा पिकावर अळीचा कहर सोबतच गहू पिकावर तांबेरा रोगाचा कहर झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे खरीप हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु जमीनी मध्ये ओलावा असल्यामुळे रब्बी हंगामात पेरणी वाढली सध्या हरभरा चे पिक भरले असून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा कहर वाढल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहे. अशावेळी शेतकरी बांधवानी हरभरा, गहू पिकांचे योग्य निरीक्षण करून अळीचा प्रादुर्भाव रोखण्या साठी वेळीच उपाय योजना कराव्यात
Add Comment